Sunday, September 20, 2020

बातम्या

 दि.21 .09. 2020

*राष्ट्रीय सौर* 
*दि 30 भद्र 1942*
सोमवार
=============


★★  : :  अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील दिवसांमध्ये व्हाईट हाऊस आणि काही विभागांना रिझिन्स नावाच्या घातक रसायनांचा समावेश असलेले लिफाफे पाठवले गेले. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की- काही अन्य धोकादायक रासायनिक लिफाफेही व्हाईट हाऊस किंवा इतर विभागांकडे पाठविण्यात आले आहेत की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. हा डावपेच रचण्यासाठी स्थानिक टपाल यंत्रणेचा वापर केल्याचे अधिकाऱ्यांना वाटत आहे.न्यूयॉर्क टाइम्स नुसार, तपास यंत्रणेला संशय आहे की, हे लिफाफे कॅनडावरुन पाठवण्यात आले आहेत. एका महिलेवर यंत्रणेला संशय आहे. तिचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

★★  : :  राज्यसभेत केंद्र सरकारने शेतीसंबंधीत दोन बिल फार्म अँड प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स (प्रमोशन अँड फॅसिलिटेशन) बिल आणि फार्मर्स (एम्पावरमेंट अँड प्रोडक्शन) अॅग्रीमेंट ऑन प्राइस एश्योरेंस अँड फार्म सर्व्हिस बिल ध्वनी मताने मंजूर केले आहे.वोटिंग दरम्यान सदनात मोठा गदारोळ झाला. विरोधी खासदारांनी वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. तृणूलचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापति हरिवंश यांचा माइक तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभागृहाचे नियम पुस्तक फाडले. सभागृहाची कार्यवाही सुरू ठेवण्यासाठी मार्शलला बोलवावे लागले. दहा मिनिटां साठी सभा तहकूब झाल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि गदारोळात सरकारने दोन्ही बिले मंजूर केली.

★★  : :  विरोधकांचा विरोध डावलत कृषि विषयक विधेयके आज राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे संसदेत मंजूर करण्यात आली आहेत. दुसरीकडे मात्र, करोना काळातही  पंजाब - हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मात्र या विधेयका विरुद्ध आपलं आंदोलन तीव्र केलंय. अनेक शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी 'रस्ता रोको' आंदोलन करत महामार्ग ठप्प करून टाकलेत. शेकडोंच्या संख्येनं शेतकरी अंबालाच्या रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. ट्रॅक्टर सहीत रस्त्यावर आलेल्या या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यां विरोधात जोरदार घोषणाबाजीही केलीय. अनेक आंदोलन कर्त्यांनी झेंडे आणि बॅनर दाखवत सरकारच्या धोरणाचा विरोध केलाय.

★★  : : *कृषी विधेयकांना मंजुरी मिळाली असली तरी त्यावरुन सुरू असलेला गदारोळ संपलेला नाही. या विधेयकांच्या मंजुरी वेळी उपसभापती हरिवंशसिंह यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे*.

★★  : :  लडाख मध्ये भारत आणि चीन मध्ये तणाव आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर ( LoC ) ३००० अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. विशेष करून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या भागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी हे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती नियंत्रण रेषेवरील उच्च सरकारी सूत्रांनी दिलीय.

★★  : :  उत्तर प्रदेश सरकारने देशातील सर्वात मोठी आणि सुंदर फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे. ही फिल्म सिटी गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडामध्ये बनवण्यात येणार आहे.  लखनऊ मध्ये शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उच्च अधिकाऱ्यां सोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सध्याच्या स्थितीत देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची आवश्यकता असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार असून त्यासाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेस वे चं क्षेत्र अधिक चांगलं असल्याचंही ते म्हणाले. या फिल्मसिटी मुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल. तसंच रोजगाराच्या दृष्टीनेही अत्यंत उपयोगी प्रयत्य ठरेल. यासाठी त्यांनी जागेसाठी पर्याय उपलब्ध करुन लवकरात लवकर कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. 

★★  : :  दिल्ली पोलिसांनी एका मुक्त पत्रकारास चीन साठी हेरगिरी करण्या वरून अटक केली आहे. या पत्रकारा बरोबरच एक महिला व अन्य एक पुरूषास देखील पोलिसांनी अटक केली आहे.दिल्ली मधील  राजीव शर्मा मुक्त पत्रकार (फ्रिलान्स जर्नलिस्ट) आहेत. राजीव शर्मा यांच्या घरातून पोलिसांनी देशाच्या सुरक्षेशी निगडीत अनेक गोपनीय कागदपत्रं हस्तगत केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजीव शर्मा यांना अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत (ऑफिशियल सीक्रेसी अॅक्ट) अटक करून, पुढील तपास सुरू केला आहे. सध्या न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

★★  : :   आर्थिक संकटाला सामोरं जात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील उद्योगांसाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तब्बल १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा शनिवारी केली. हे पॅकेज आत्मनिर्भर भारत आणि जम्मू-काश्मीर प्रशासना द्वारे करण्यात आलेल्या उपायां व्यतिरक्त असेल

★★  : :    राज्यसभेत  महामारी रोग विधेयक (संशोधक) विधेयक 2020 पास झाले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संसदेत हे विधेयक पास केले. या विधेयकात महामारीदरम्यान देशात डॉक्टर्स, नर्स, आशा कार्यकर्त्यांची सुरक्षा, तर हल्ला करणाऱ्यावर शिक्षा देण्याची तरतूद आहे. केंद्र सरकारने 123 वर्ष जुन्या कायद्यात बदल केला आहे. याअंतर्गत डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्यांना जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. हल्लेखोरांना 50 हजार ते 2 लाख दंड करण्याची तरतूद आहे. याशिवाय 3 महिन्यांपासून 5 वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते. गंभीर दुखापत झाल्यास जास्तीत जास्त 7 वर्षे शिक्षा होऊ शकते. हा अजामीन पात्र गुन्हा असेल.

★★  : :  तेलंगणा विधानसभेने ‘तेलंगणा स्टेट बिल्डींग परमिशन अप्रुवल अॅण्ड सेल्फ सर्टिफिकेशन सिस्टम अर्थातच टीएस- बीपीएएसएस विधेयक मंजूर केले आहे.  सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व नगरपालिका आणि जीएचएमसी मध्ये  या विधेयकाची अंमलबजावणी करण्यात येईल. या नव्याने मंजूर केलेल्या विधेयका नुसार, ७५ चौरस यार्ड पेक्षा कमी भूखंडासाठी आणि ७ मीटर पर्यंतच्या इमारतीं साठी परवानगीची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे ७५ ते ६०० चौरस यार्ड मापाच्या भूखंडात बांधकाम करण्यासाठी नागरिक सेल्फ सर्टीफिकेशन द्वारे परवानगी घेऊ शकतात. त्याच बरोबर ६०० चौरस यार्ड पेक्षा मोठ्या आकाराच्या भूखंडा साठी आणि १० मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या सर्व लेआउटची मंजूरी एकाच ठिकाणी देण्यात येईल.

★★  : :  केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून शनिवारी लोकसभेत 2 हजार रुपयांच्या नोटेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली. अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सांगितलं की, 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. लोकसभेत लेखी उत्तरामध्ये त्यांनी म्हटलं की, सरकार कोणत्याही चलनातील नोटेबद्दल निर्णय घेण्याआधी आरबीआयचा सल्ला घेते. यामध्ये सर्वासामान्यांसाठी पुरेशा नोटा उपलब्ध करून देण्याचा समावेश असतो.आर्थिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 मध्ये प्रेसकडे 2 हजारांच्या नोटा छापण्यासाठी कोणतंही मागणीपत्र पाठवण्यात आलं नव्हतं.मात्र याचा अर्थ असा नाही की सरकार 2 हजाराच्या नोटेची छपाई बंद करण्याचा विचार करत आहे. यावरून आता हे स्पष्ट होत आहे की नोट बंद होणार अशा अफवा आहेत.

★★  : :  काेराेनावर बहुप्रतिक्षेत असलेली लस ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असून त्याचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस सोमवारपासून पुण्यातील ससून रुग्णालयात सुरुवात हाेणार आहे. ससून रुग्णालयाने त्यादृष्टीने लसची चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांना नावनाेंदणी करण्यास सांगितले आहे.

★★  : :  पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
 २३ सप्टेंबरला ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश यांसह इतर चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी, ११ ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत, त्या राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध सूचनाही केल्या होत्या.

★★  : :  कोरोनाच्या काळात मागील सात महिन्यांत पोलिसांनी खूप काम केले आहे. आमचे पोलीस जरूर थकले आहेत. पण हिम्मत हरलेले नाहीत. या काळात कर्तव्य निभावताना 208 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या पोलिसांच्या कुटुंबाला 65 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दिली. 

★★  : : चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) ने आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या ओपनिंग मॅचमध्ये मुंबई इंडियंसला 5 विकेट्सने पराभूत केले. अबु धाबीमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 162 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या सीएसकेने 19.2 ओव्हरमध्येच 5 विकेट्स गमावून 166 धावा करत सामना आपल्या नावे केला. 

★★  : :  युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने १३ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये राेहमर्षक विजयाची नाेंद केली. दिल्लीने आपल्या पहिल्याच सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर सुपर विजय संपादन केला. यंदाच्या लीगमधील हा पहिला सुपर आेव्हरमधील विजय ठरला. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पंजाब संघानेही ८ गड्यांच्या माेबदल्यात १५७ धावा काढून सामना टाय केला. सामन्याचा निकाल सुपर आेव्हरमध्ये लावण्यात आला. 

Tuesday, September 15, 2020

एम.एस. सुब्बुलक्ष्मी

 

एम.एस. सुब्बुलक्ष्मी
Ms subbulakshmi.jpg
एम.एस. सुब्बुलक्ष्मी
आयुष्य
जन्म१६ सप्टेंबरइ.स. १९१६
जन्म स्थानमदुरै
मृत्यू११ डिसेंबरइ.स. २००४
मृत्यू स्थानचेन्नईतमिळनाडू
संगीत साधना
गायन प्रकारकर्नाटक संगीत
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळइ.स. १९३०-२००४
गौरव
पुरस्कारपद्मभूषण (इ.स. १९५४), मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९७४), पद्मविभूषण (इ.स. १९७५) भारतरत्‍न (इ.स. १९९८)

कुंजम्मा हे त्याचे बालपणीचे लाडाचे नाव, त्यांच्या आई अक्कमलाई यासुद्धा नावाजलेल्या व्हायोलिन वादक होत्या , सुब्बलक्ष्मी त्यांच्या वीणावादक आईकडून प्राथमिक संगीत शिकल्या. सहाव्या इयत्तेत असतानाच शिक्षकांनी मार दिल्यामुळे सुब्बलक्ष्मी यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या पहिल्या कॅसेटचे उदघाटन केले. त्यांचे मार्गदर्शक व सल्लागार असलेल्या त्यागराजन यांच्याशी त्या १९४० साली विवाहबद्ध झाल्या. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपले संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केले. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, सावित्री, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.

सुब्बलक्ष्मी यांच्यावर व्ही राजगोपाल यांनी दिग्दर्शित केलेला एक लघुपट आहे.

सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते

  • चाकर राखो जी (हिंदी)
  • पग घुंगरु बॉंध मीरा नाचे रे
  • भज गोविंदम
  • मधुराष्टकम्
  • मोरे ऑंगना में (हिंदी)
  • मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी)
  • श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम्‌
  • विष्णुसहस्रनाम
  • वृंदावन कुंज भवन (हिंदी)
  • हनुमान चालिसा
  • हरि तुम हरो (हिंदी)

१७ सप्टेंबर - मराठवाडा मुक्ती संग्रामदिन

 


विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम!

आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं –

मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे ६४५९० चौ. किमी असून यामध्ये पुढील ८ जिल्हे आणि त्यातील – ७८ तालूके व ६३ बाजारपेठेची शहरं आहेत.

1) औरंगाबाद
2) नांदेड
3) परभणी
4) बीड
5) जालना
6) लातूर
7) उस्मानाबाद व
8) हिंगोली

 

marathvada_marathi-pizza

 

दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, ५२ दरवाजे, पानचक्की, ३ जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी –

पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते.

निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.

मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले.

दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

 

nzam-state_marathi-pizza

 

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.

मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले.

या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.

मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.

१५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.

हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला…!हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला…!हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला…!१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.

 

patel_nizam_marathwada mukti sangram marathipizza

 

१७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.

Monday, September 14, 2020

विश्वेश्वरय्या, सर मोक्षगुंडम September 15, 2020

 सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या


विश्वेश्वरय्या, सर मोक्षगुंडम : ( १५ सप्टेंबर १८६१-१४ एप्रिल १९६२). प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम यागावचे.  त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.  

विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले.

स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नासिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.

खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यांच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला. १९०६ साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची साहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. १९०७ साली मुंबई सरकारच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. १९०९ साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हैदराबाद शहराची पुनर्रचना, मूसा व इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. याच वर्षी म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीनुसार त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली. १९१२ ते १९१८ ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग,कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. उदा., म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन यांची उभारणी, कन्नड साहित्य अकादमी, आर्थिक लेखा परीक्षणाबरोबरच कार्यक्षमता लेखा परीक्षण वगैरे. रेशीम उत्पादन, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, हॉटेल व उपाहारगृहे, विश्रामधाम, मुद्रणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली. म्हैसूरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. आपल्या प्रयत्‍नांनी रेल्वेचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या कक्षेत आणले. काही ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारले. सेवाभरती शर्ती, मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्ये त्यांनी केली. १९२६ साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेचा स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, श्री जय चामराजेंद्र ऑक्युपेशनल इन्स्टिट्यूट वगैरे संस्थांशी घनिष्ट संबंध आला. मुंबईची प्रिमियर ऑटोमोबाइल इंडस्ट्री स्थापण्यातही त्यांनी विशेष प्रयत्‍न केले. हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स) व ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेतही त्यांनी भाग घेतला.

विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेने पाणीपुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणीपुरवठा योजना व सुरत शहर पाणीपुरवठा योजनाही साकार केली. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी सक्कर बंधाऱ्यांची उभारणी करून सोडविला. शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या व कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांनीच सुरू केली. ओरिसा राज्यातील महापूराच्या नियंत्रणाचे निर्मातेही तेच. म्हैसूरपासून १८ किमी. वरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. सु. ४० मीटर उंचीला लागणारा पाया लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. आज या धरणामुळे सु. ८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येते. १२.५ कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना त्यांनीच पूर्ण केली. यांखेरीज कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड व विजापूर शहर पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष (१९२१-२२), भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष (१९२५), मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, मुंबई बॅक बे चौकशी समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार, भद्रावती पोलाद कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष, अखिल भारतीय उत्पादक संस्था (१९४१) संचालक, जमशेटपूर टाटा लोखंड व पोलाद कारखाना, मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र, मुंबई प्रांत आरोग्य समितीचे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक उद्योग उन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मुंबई, कराची, बडोदा, सांगली, मोरवी, भोपाळ, पंढरपूर, अहमदनगर, नागपूर, भावनगर,राजकोट, गोवा या नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले.

विश्वेश्वरय्या यांनी पाच वेळा अमेरिकेचे दौरे केले. खेरीज जपान, इटली, इंग्‍लंड, स्वीडन, रशिया, कॅनडा, सिलोन (श्रीलंका), जर्मनी व फ्रान्स या देशांना विविध निमित्तांनी भेटी दिल्या.

ईश्वरचंद्र विद्यासागर September 15, 2020

 विद्यासागर, ईश्वरचंद्र : (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवतीदेवी असे होते. प्राथमिक शिक्षण जन्मगावी घेऊन कलकत्त्याच्या (कोलकात्याच्या) संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. १८३९ साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती; म्हणून बंदोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले. ते अठरा वर्षांचे असताना त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्‍न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला.

पंडित ईश्वरचंद्र यांनी शिक्षणखात्यात साध्या शिक्षकापासून (Fort William College, १८४१) ते शिक्षणनिरीक्षकाच्या हुद्द्यापर्यंत (१८५४—५८) काम केले. सरकारी शिक्षणखात्यात असताना शिक्षणखात्यातर्फे मुली शिकल्या पाहिजेत, या हेतूने त्यांनी ३५ नवीन बालिका विद्यालये, एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय आणि बंगालमधील प्रमुख शहरांत आदर्श (Model) विद्यालये स्थापन केली. संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राह्मणेतर विद्यार्थांना शिक्षण मिळत नसे. ते धोरण रद्द करून त्यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश दिला. १८५८ साली अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने ते शिक्षणखात्यातून बाहेर पडले. त्यापूर्वीच विधवांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष गेले होते. स्वतः संस्कृत पंडित असल्याने पराशर संहितेत विधवाविवाहास मान्यता असल्याचा दाखला त्यांनी काढून दाखविला. १८५६ साली विधवाविवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ईश्वरचंद्र हे स्वतः कर्ते सुधारक होते. स्वतःच्या मुलींची लग्‍ने त्यांनी त्या चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत. आपल्या मुलाचे लग्‍न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते. कुलीन ब्राह्मणवर्गातील बहुपत्‍नीकत्वाची चाल, बालविवाह,  मद्यपान इ. अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंगालमध्ये चळवळी केल्या.

ईश्वरचंद्र विद्यासागर हे आधुनिक बंगाली गद्याचे जनक समजले जातात. त्यांची भाषा सुबोध व सामान्य जनांना सहज समजेल अशी आहे. बंगाली भाषेच्या प्रकृतीला अनुरूप अशी गद्यशैली त्यांनी प्रचलित केली आणि त्यामुळेच बंगाली गद्याच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला जातो. त्यांच्यापूर्वी राजा राममोहन रॉय (Raja RamMohan Roy) यांनी गद्यशैली रूढ केली होती; पण ती पंडिती वळणाची होती. सर्वसामान्यांना ती सहजगम्य नव्हती. त्यांची स्वतःची प्रकृती तत्त्वचिंतकाची असल्याने भाषाशिल्पाकडे त्यांनी कधी लक्षच दिले नाही. ईश्वरचंद्रांची प्रकृती त्यांच्याहून भिन्न होती. ती जशी पंडिताची तशीच साहित्यरसिकाची व सामाजिक संस्कारकाची होती. म्हणून आजही त्यांचे साहित्य वाचले जाते. त्यांचे लेखन मुख्यतः बंगाली आणि संस्कृत भाषांत आहे. ईश्वरचंद्रांनी मुख्यतः शिक्षणाचा प्रसार, समाजसुधारणा आणि साहित्यनिर्मिती अशा त्रिविध भूमिकांतून लेखन केले. संस्कृत भाषेच्या सुलभ अध्ययनासाठी त्यांनी बोधोदय (१८५१), उपक्रमणिका (१८५१), ऋजुपाठ (३ भाग, १८५१ – ५२), व्याकरणकौमुदी (३ भाग, १८५३ व १८६२) व वर्णपरिचय(२ भाग, १८५५) हे ग्रंथ लिहिले. त्याचप्रमाणे बंगाली भाषा शिकण्यासाठी कथामाला (१८५६) तसेच शब्दमंजरीनावाचा शब्दकोश तयार केला. बांगलार इतिहास (१८४८), जीवन चरित (१८४९), चरितावलि (१८५६) आणि भूगोल-खगोल-वर्णन (१८९२) हे ग्रंथ त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोणाचे आणि चतुरस्र जिज्ञासेचे द्योतक आहेत. त्यांची पहिली साहित्यकृती वेताल पंचविंशति (१८४७) ही सुलभ बंगाली भाषेचे प्रतीक म्हणून आजही लोकप्रिय आहे. शकुंतला उपाख्यान (१८५४), सीतार वनबास (१८६०), आख्यान मंजरी (१८६३) आणि भ्रांतिविलास (१८६९) ह्या त्यांच्या इतर साहित्यकृती आहेत. पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी विधवाविवाह (१८५५) हा ग्रंथ लिहिला. विधवाविवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातूनच दाखविणारा आणि पंडितांना त्यांनी प्रमाणभूत मानलेल्या ग्रंथांच्या आधारेच निरुत्तर करणारा ग्रंथ म्हणून तो अद्वितीय ठरला. यांव्यतिरिक्त विद्यासागर यांनी संस्कृत नाटकांचे तसेच महाभारतादी इतर बारा ग्रंथांचे संपादन केले आहे.

१८७७ साली कलकत्त्यास भरलेल्या दरबारात ईश्वरचंद्र यांना इंग्‍लंडच्या राणीकडून बहुमानाची सनद मिळाली व पुढे ‘सी. आय. इ.’ ही पदवीही मिळाली. वैयक्तिक आचरणात ते अत्यंत साधे, परंतु निर्भय होते. समाजसुधारणेच्या बाबतीत ते राजा राममोहन रॉय यांचे वारसच म्हणावे लागतील. त्यांच्या सामाजिक कार्यामागील निकोप बुद्धिवाद त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्यापासूनच उचलला होता.

ईश्वरचंद्रांनी आपल्या आयुष्यात पुष्कळ धन मिळविले; पण ते सारे त्यांनी दुःखी, कष्टी, दलित, अपमानित, उपेक्षित ह्यांच्या साह्यार्थ खर्चिले. त्यांची स्वतःची राहणी अगदी साधी होती. ते अज्ञेयवादी होते. देव, धर्म, अध्यात्म इत्यादींच्या गुंत्यात त्यांनी स्वतःला कधीच अडकवून घेतले नाही. ‘मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो’, असे ते म्हणत. हा आपला धर्म त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत निष्ठापूर्वक आचरिला. त्यामुळे सारे जग त्यांना ‘विद्यासागर’ म्हणून ओळखीत असले, तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना ‘दयासागर’ म्हणूनच अधिक ओळखते.

संदर्भ :

  • Banerjee, Hiranmay, Iswarchandra Vidyasagar,  Delhi, 1968.
  • साने गुरुजी, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, पुणे, १९६६.

गिजुभाई बधेका September 15, 2020


बधेका, गिजुभाई (Badheka, Gijubhai) : (१५ नोव्हेंबर १८८५–२३ जून १९३९). आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म चितळ (सौराष्ट्र) येथे झाला. वडिलांचे नाव भगवानजी व आईचे नाव काशीबा. गिरिजाशंकर ऊर्फ गिजुभाई यांचे प्राथमिक शिक्षण वेळा येथे व त्यानंतरचे शिक्षण भावनगर येथे झाले. १९०५ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते भावनगर येथे त्यांचे मामा हरगोविंद पंड्या यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांनी सामळदास महाविद्यालयामध्ये गिजुभाईंचे नाव दाखल केले; परंतु तेथील अभ्यासक्रम पुरा न करताच त्यांनी महाविद्यालय सोडले व उपजीविकेसाठी २०१७ मध्ये आफ्रिकेस प्रयाण केले आणि तेथील सॉलिलीटरच्या कमपनीत काम केले. तेथील तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर १९१० साली ते भारतात परतले. त्यांनी आफ्रिकेतील अनुभवांवर आधारित अशी प्रवासवर्णने लिहिली. भारतात परतल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास केला व १९११ पासून वकिलीचा व्यवसाय सुरू केला. पुढे हा व्यवसाय सोडून भावनगर येथील दक्षिणामूर्ती या संस्थेत त्यांनी साहाय्यक अधीक्षक म्हणून नोकरी पतकरली. कालांतराने ते त्या संस्थेत प्राचार्य झाले. १९०२ साली ते हरिबेन यांच्याशी विवाहबद्ध झाले. हरिबेन यांच्या निधनानंतर १९०६ साली जदिबेन यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. नरेंद्रभाई हा त्यांचा एकुलता एकमुलगा

.

गिजुभाई हे वकिलीचा व्यवसाय करीत. स्वतःच्या कचेरीत बसले असता एका लहान मुलाला हातपाय बांधून शाळेत नेत असल्याचे त्यांनी पाहिले. लहान मुलांना अशा तऱ्हेने शाळेत न्यावे लागते, याचे त्यांना फार वाईट वाटले. त्या सुमारास त्यांनी इटलीतील मारिया माँटेसरी (Maria Montessori) यांचे नाव ऐकले होते. माँटेसरी बाईंच्या शाळेत मुले हसत-खेळत जातात, आनंदाने बागडतात हे त्यांनी त्यांचे मामा मोटुभाई यांनी दिलेल्या माँटेसरींच्या साहित्यातून वाचले होते. भारतातील परिस्थिती त्यापेक्षा वेगळी होती, हे पाहून त्यांनी माँटेसरींना आपले गुरू मानून भारतामध्ये माँटेसरी पद्धतीची बालशिक्षणाची शाळा सुरू करावयाचे ठरविले. त्यांनी १९१८ मध्ये बालशिक्षणाचे प्रत्यक्ष काम सुरू केले. ऑगस्ट १९२० मध्ये त्यांनी दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना केली. भारतात भारतीयाने सुरू केलेला बालशिक्षणाचा हा पहिला प्रयोग होता. या प्रयोगाची रचना संपूर्णपणे बालकेंद्री आणि शास्त्रीय होती. बालशाळेतबालकांना स्वतंत्रपणे कृती करू देणे आणि शिक्षकाने त्यांचे अवलोकन करत राहावे, यावर गीजुभाई यांनी भर दिला.

गीजुभाई यांनी बालमंदिराची रचना करताना बालकाला केंद्रबिंदू ठेऊन तशी रचना केली आहे. त्यामध्ये त्यांनी क्रीडांगण, मैदान, बाग, पशुपक्षी संगोपन, पुस्तकालय, हस्तकला उद्योग, कला मंदीर, स्नानागार, विश्रांती विभाग आणि अपंग व मतीमंद बालकांसाठी विशेष विभाग असे विभाग होते. त्याचबरोबर त्यांनी बालकांच्या इंद्रीय विकासाची साधने, वेगवेगळ्या प्रकारची चित्रे, संगीताची साधने, बैलगाडी, मोटार, कचराकुडी, बागकाम साधने, रेडिओ इत्यादी साधने बालमंदिरात ठेवले होते. बालकांच्या भाषा, गणित, परिसर इत्यादी संबंधित शिक्षणासाठी उपयुक्त साधनेही तयार केली. बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे यासाठी चित्रपट पाहणे, कथाकथन करणे, प्रदर्शने भरविणे, उत्सव साजरे करणे अशी अनेक कार्यक्रम ते बालमंदिरात आयोजित करत.

गिजुभाईंनी बालशिक्षणाच्या सर्वच अंगांकडे लक्ष दिले. बालकांचे शास्त्र जाणून त्यांच्याप्रमाणे बालकांना शिकविणाऱ्या शिक्षकांचा गट तयार व्हावा या हेतूने त्यांनी १९२५ मध्ये भारतातील पहिले पूर्वप्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय (अध्यापक मंदिर) सुरू केले. तसेच वस्तीतील, खेड्यांतील प्रौढ साक्षर व्हावे यासाठीही त्यांनी मोठी चळवळ उभारली. यासाठी त्यांनी अक्षरज्ञान नावाची पुस्तिका लिहिली. बालशिक्षणाच्या प्रसाराचे उद्दिष्ट ठेऊन १९२६ मध्ये त्यांनी माँटेसरी संगाची स्थापना केली. त्यानंतर १९४९ मध्ये तिचे नूतन बालशिक्षण संघ असे नामकरण करण्यात आले. त्यांनी शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक (Tarabai Modak) यांच्या सहकार्याने शिक्षणपत्रिका हे शिक्षणविषयक गुजराती मासिक सुरू केले. पुढे १९३३ मध्ये हे मासिक मराठीतून आणि १९३४ मध्ये हिंदीतूनही प्रकासित होऊ लागले. जुगतराम या सहकाऱ्याबरोबर बालकांसाठी त्यांनी वाचनमाला लिहिली. या प्रकारची त्यांची एकूण शंभरांवर पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांत बालनाटके, कथा, लोकगीते इत्यादींचा समावेश होता. त्यांनी पालकांसाठी पुस्तकेही लिहिली आणि प्रौढांसाठी साक्षरतावर्ग चालविले.

गीजुभाई यांनी बालकांच्या शिक्षणासंदर्भात व्यापक दृष्टी मांडताना म्हणतात की, देशातील लाखो बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न हा केवळ शिक्षम खात्याचा नसून तो राज्याचा, शासनाचा, लोकांचा असतो. शाळेमध्ये केवळ माहितीचे शिक्षण न देता कृतीवर भर द्यावा. मुलांना वर्गात मारून त्यांना नितीमान करता येत नाही. शिक्षणात सर्वांत महत्त्वपूर्ण शिक्षम हे हृदयाचे शिक्षम असते, असे ते म्हणत.

गिजुभाईंच्या कार्याने पश्चिम भारतात बालशिक्षणाचा पाया घातला गेला. त्यांच्या कार्यावर माँटेसरी, फ्रीड्रिख फ्रबेल (Friedrich Fröbel) आणि योहान हाइन्‍रिक पेस्टालॉत्सी  (Johann Heinrich Pestalozzi) यांच्या विचारांची छाप होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून गुजरात साहित्यसभेने त्यांना रणजितराम सुवर्णपदक आणि दहा हजार रुपयांची देण्यात आले. तसेच गलीयारा पुरस्कारही त्यांना मिळाला. ते १९२८ मध्ये भारतात पार पडलेल्या दुसऱ्या माँटेसरी संमेलनाचे अध्यक्ष, तर १९३६ मध्ये हैदराबाद येथील अखिल भारतीय बालसाहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. गिजुभाई बालकांसाठी आईसारखे काम करीत. त्यामुळे त्यांना ‘बालमित्र’ ही पदवी तर मिळालीच; पण गमतीने ‘मूछिवाली माँ’ (मिशावाली आई) असे नामाभिधान प्राप्त झाले.

गिजुभाईंनी १९३६ साली मतभेदांमुळे दक्षिणामूर्ती ही संस्था सोडली आणि राजकोट येथे अध्यापक मंदिर स्थापन केले. अतिश्रमाने त्यांची तब्येत बिघडली. त्यातच अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • पानसे, रमेश, बालशिक्षण स्वरूप व नवी दिशा.
  • भावसार, सीमाभाई अनु.; काशिनाथ त्रिवेदी, बालमित्र गिजुभाई, हिंदी शिक्षण पत्रिका, कोसबाड, १९५०.
  • Naik, Chitra, Growing up at Kosbad Hill, Kosbad, 1978.


Ozone day information September 15, 2020

https://youtu.be/rKx09w-7PIk 

Sunday, September 13, 2020

समावेशक शिक्षण September 14, 2020

समावेशक शिक्षण 

भिन्न क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते, त्यास समावेशक शिक्षण म्हणतात. हे शिक्षण ‘समान संधी’ तत्त्वावर आधारलेले असून या शिक्षणपद्धतीच्या मुख्य प्रवाहात सर्वांचा स्वीकार केला जातो.

इतिहास : १९६० मध्ये ‘सर्वांसाठी शिक्षणʼ (Education for all) ही संकल्पना जगातील अनेक देशांत अस्तित्वात आली होती. या संकल्पनेस हळुहळु चालना मिळून तिचा १९८१ च्या काळात प्रसार होऊ लागला. १९९० मध्ये सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेतून ‘समावेशक शिक्षणʼ या संकल्पनेचा उदय झाला. १९९४ मध्ये भारतासह एकूण ९२ देशांनी आणि २५ शैक्षणिक संघंटनांनी संकल्पनेस मान्यता दिली व स्वीकारली आहे. १९९९ मध्ये युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization : UNESCO) या संस्थेने नियमित शाळेतील भिन्न मुलांच्या गरजांनुसार सर्वांसाठी अध्यापन कार्यनीती विकसीत करावी, असे सुचविले. युनेस्कोच्या मते, ‘वंचित बालके, युवक व प्रौढ यांच्या अध्ययन गरजांचा शोध घेत लक्ष केंद्रित करणारा विकासात्मक उपागम म्हणजे समावेशक शिक्षणʼ.

समावेशक शिक्षण या व्यवस्थेत ‘विशेष खोली योजनाʼ आणि ‘फिरता शिक्षक योजनाʼ (Mobile Teacher) अपेक्षित असतात. विशेष खोली योजनेनुसार बालकांच्या विशेष गरजांप्रमाणे खास शिक्षण साहित्य विशेष खोलीत उपलब्ध असते. फिरता शिक्षक योजनेत नियुक्त फिरत्या शिक्षकाने अनेक समावेशक शाळांना भेटी देऊन साधने व उपकरणे यांची ने-आण करणे, वेळापत्रक आखणी करणे, विशेष गरजांनुसार नियमित शिक्षकांशी व शाळेच्या प्रमुखांशी विचार विनिमय करणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे इत्यादी अपेक्षित असते. सर्व तऱ्हेच्या मुलांना भेदभावरहित शिक्षणाची समान संधी, सर्वांना दर्जेदार शिक्षण या तत्त्वांवर समावेशक शिक्षण चालते. १९९४ मध्ये समावेशक शिक्षणास विधीवत मान्यता, कार्यक्रम मुल्यमापन, विशेष मुलांच्या पालकांची संघटना, अशा किशोरांचे व्यावसायिक प्रशिक्षण, संशोधन व विकास इत्यादी मार्गदर्शक तत्त्वांनुसार समावेशक शिक्षणाची कार्यवाही व्हावी, असे ठरले.

वैशिष्ट्ये : समावेशक शिक्षणाची पुढील वैशिष्ट्ये ही समावेशक शिक्षकास आपली अध्यापननीती ठरविण्यास मदत करतात :

  • सामूहिक कृतींमुळे विद्यार्थ्यास सहकार्यात्मक अध्ययन प्रभावी वाटते. गटबांधणी, नेतृत्व विकास सहभाग, आंतरक्रिया इत्यादी सामाजिक कौशल्ये सहकार्यात्मक अध्ययनामुळे विकसीत होऊन समावेशक शिक्षणाचे बलस्थान ठरते. परस्पर सहकार्याने शैक्षणिक विकासात मदत करणे, सार्वांची प्रगती होणे हेच गटाचे यश या कार्यनीतीच्या वैशिष्ट्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्यांच्या अंगवळणी ती कशी पडतील, हे शिक्षकाने पाहावे.
  • वर्गशिक्षकाने सर्वप्रकारच्या मुलांना विषय ज्ञान देताना त्यांच्यामध्ये अध्यापन कुशलतेची आवश्यकता असते. तो अध्यापन करीत असताना दुसऱ्या शिक्षकांकडून जरूर तेव्हा त्यास आधार देऊन अध्यापनातील उणीव भरून काढली जाते. अशा वेळी उभय शिक्षकांमधील संबंध लवचिक आणि संपर्क प्रभावी असणे आवश्यक आहे.
  • आपल्या वर्गातील वा खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एखाद्या विद्यार्थ्याने शिकविल्यास त्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्रतिष्ठा, आत्मविश्वास बळावेल आणि त्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये विषय समज वाढेल.
  • उच्चार, भाषा, शरीर, व्यवसाय यांसंबंधित त्रुटी विशेष मुले व सामान्य मुले यांच्यातून दूर होण्यासाठी संबंधित उपचारतज्ज्ञ गरजनिहाय उपचार करतात.
  • दोन्ही तऱ्हेच्या मुलांच्या शैक्षणिक, भावनिक, सामाजिक इत्यादी गरजा लक्षात घेऊन अभ्याक्रमात वेळो वेळी सुधारणा केल्या जातात.
  • ज्या शाळांकडे सर्व प्रकारच्या अध्ययनाच्या सुविधा असतात, त्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या मुलांना प्रवेश देऊन शिक्षक व शिक्षणसंस्था त्यांचे स्वागत करतात.
  • वर्गामध्ये जास्त विद्यार्थी असले, तरी शिक्षक मुलांकडे वैयक्तिक लक्ष देऊन सर्व उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करतात व त्यांची प्रगती करतात.
  • सर्व मुलांना सामाजिक कार्याची माहिती दिली जाते.
  • मुलांच्या शैक्षणिक व इतर समस्या सोडविण्याकरिता सर्व शिक्षक विचारविनिमय करतात.
  • गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहात नाही.

अमेरिका व न्युझिलंड या देशांमध्ये समावेशक कार्यक्रम यशस्वी झाला आहे. १९९७ मध्ये ६ ते १४ या वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून त्यांचा क्षमताविकास साधण्यासाठी दर्जेदार व व्यवहारोपयोगी शिक्षण एकत्र देण्याचे ठरले. अंती त्यालाच समावेशक शिक्षणाचे रूप लाभले.

फायदे : समावेशक शिक्षण हे महत्त्वाची शिक्षणपद्धती असून तिचे फायदे पुढील :

  • सर्वसामान्य मुले आणि अपंग मुले यांचा एकमेकांशी संबंध येत असल्यामुळे वातावरणात ते एकमेकांना मदत करायला शिकतात; एकमेकांपासून ते संवाद व आंतरक्रियात्मक कौशल्ये शिकतात; आंतरक्रियांपासून ते मैत्री, आपुलकी, परस्परसंबंध, वर्ग सभासद म्हणजे काय इत्यादी शिकतात. उभय प्रकारची मुले परस्परांशी सकारात्मक वागतात. परिणामी भावी नागरीक म्हणून सामान्य मुलांना विशेष गरजा असलेल्या नागरीकांची कसे वागावे, हे उमजते.
  • सर्वसामान्य मुले आणि अपंग मुले एकत्र शिकल्याने सरकारचा शैक्षणिक खर्चाचा बोजा कमी होण्यास मदत होतो.
  • समावेशक शिक्षणामुळे ७५ टक्के अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश मिळाल्याने विशेष शाळेच्या मर्यादित वातावरणापेक्षा सर्वांबरोबर शिक्षणाची संधी मिळेल. तसेच प्रार्थना, कला, क्रिडा, मधल्या सुट्टीत डबा खाणे, स्पर्धा इत्यादींबाबत विशेष मुलांना वर्गातील सामान्य मुलांशी समायोजन कसे करायचे हे समजते. कठपुतळी, चित्रपट, व्याख्यान, आदर्श वाचन, आदर्श वर्तन यांसारख्या कार्यक्रमांतून उभय मुलांच्या जाणीवा रुंदावल्यामुळे त्यांच्यामध्ये अपेक्षित जाणीव निर्माण होते.

मर्यादा :

  • वर्गात विशेष व सामान्य अशी दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात. त्यामुळे शिक्षक दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करून ज्या पद्धतीने व गतीने वर्गात अध्यापन करतो, ते अध्यापन सामान्य मुलांच्या दृष्टीने संथ असते. परिणामी सामान्य विद्यार्थी कंटाळण्याची शक्यता असते.
  • विशेष मुलांच्या गरजांकडे अपेक्षित विशेष लक्ष देण्यास शिक्षकास सवड मिळत नाही.

सर्वसामान्य शाळा आणि समावेशक शाळा यांतील फरक

सर्वसामान्य शाळा

समावेशक शाळा

सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश व शिक्षण दिले जाते.

सर्वसामान्य विद्यार्थ्यी व विशेष विद्यार्थ्यी या दोघानांही शाळेत प्रवेश व समान शिक्षण दिले जाते.
शिक्षणाचा आराखडा व पद्धती पूर्वनियोजित असते.

शिक्षणपद्धतीत लवचिकता असते.

सामुदायिक प्रकारची अध्यापनपद्धती असते.

वैयक्तिक प्रकारची अध्यापनपद्धती असते.

अध्यापनपद्धती विषयकेंद्रित असते.

अध्यापनपद्धती बालकेंद्रित असते.

केवळ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कौशल्य असलेले शिक्षक असतात.

सर्वसामान्य विद्यार्थी व विशेष शैक्षणिक गरज असणारे विद्यार्थी या दोघांनाही शिकविण्याचे कौशल्य असलेले शिक्षक असतात.

सर्वसामान्य मुलांचा विचार करून भौतिक सुविधा उपलब्ध असतात.

सर्वसामान्य मुले व विशेष मुले या दोघांचाही विचार करून भौतिक सुविधा उपलब्ध असतात. त्यात वेळो वेळी वाढ व बदल केली जाते.

सर्वसामान्य शाळेतील शैक्षणिक वातावरण विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता अनुकूल असेलच असे नाही.

समावेशक शाळेतील शैक्षणिक वातावरण विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता अनुकूल असते.

 

मूल्यमापन :

  • अर्थ : समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे कितपत साध्य झाली, हे जाणून घेण्यासाठी तपासणी वा पुर्नतपासणी करणे म्हणजे अशा शिक्षणाचे मूल्यमापन होय. विद्यार्थ्यांच्या मनोकायिक प्रगतीची, अध्ययन कृतींची तपासाणी यात केली जाते. त्यांच्या समस्या कमी करून कमाल उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. सातत्यपूर्ण मूल्यमापनामुळे शिक्षक आपल्या अध्यापनातील उणिवा दूर करून त्यात सुधारणा करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तन बदलात फरक पडल्याने अध्यापकास त्याप्रमाणे पालकांना मार्गदर्शन करता येते.
  • पद्धती : साधने व तंत्रे ही मूल्यमापन पद्धतीला पूरक व संवादी असावी. औपचारिक पद्धतीने मूल्यमापन करताना लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा, मानसशास्त्रीय कसोट्या, चिकीत्सापद्धती यांचा आवश्यकतेप्रमाणे वापर केला जातो. अनौपचारिक पद्धतीने मूल्यमापन करताना, निरीक्षण, मुलाखत, व्यक्ति-अभ्यास, संकलित नोंद पत्रिका या साधनतंत्रांचा सोयीप्रमाणे वापर केला जातो.
  • अध्यापक भूमिका : अशा मूल्यमापनात विशेषबालकांची शैक्षणिक प्रगतीची तपासणी करताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, शिक्षक वर्तन, विशेष गरजा, अध्यापन वेळ यांबाबतीत शिक्षकाने लवचिक असावे. वस्तुनिष्ठ व तोंडी प्रश्न यांवर अध्यापकांनी भर द्यावा. विशेष मुलांना सर्वांगीण मदत करताना अध्यापकाने हुशार विद्यार्थ्यांच्या साह्याने विशेष मुलांना उत्तेजन देऊन त्यांना उद्दिष्टाप्रत न्यावे. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार गुण द्यावे. पालक चर्चेनंतर मुलांच्या आगामी प्रगतीबाबत धोरण आखावे.

संदर्भ :

  • आवचर, एस., विशेष शिक्षण, पुणे, २०१२.
  • गुळवणी, एम., मार्गदर्शन आणि समुपदेशन, पुणे, २०११.
  • जगताप, एच. एन., शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, २००९.
  • दुनाखे, ए., शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन आणि समुपदेशन, पुणे, २००९.
  • भंगाळे, शै., समावेशक शिक्षण, जळगांव, २०१६.
  • सोहोनी-शिरोडे, समावेशक शिक्षण, पुणे, २०१६.
  • Gathoo & Others, Towards Inclusive Education, Mumbai, 2014.
  • Roa, Usha, Inclusive Education, Mumbai, 2012.

फ्रीड्रिख फ्रबेल September 14, 2020

 फ्रबेल, फ्रीड्रिख : (२१ एप्रिल १७८२–२१ जून १८५२). जर्मन शिक्षणतज्ज्ञ व बालोद्यान शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. त्यांचा जन्म ओबरव्हाइसबाख (थुरिंजिया) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव फ्रीड्रिख विल्हेल्म ऑगस्ट फ्रबेल होय. त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे रीतसर प्राथमिक शिक्षण घेता आले नाही. पंधराव्या वर्षी त्यांना एका वनव्यावसायिकाकडे उमेदवार म्हणून दोन वर्षांसाठी ठेवण्यात आले. या दोन वर्षांच्या काळात प्राणी व वनस्पती यांचे निरीक्षण करण्याची संधी त्यांना लाभली.

फ्रबेल हे सतरा वर्षांचे असताना येना विद्यापीठात शिकत असलेल्या आपल्या वडीलभावाला भेटण्यास गेले आणि शिकण्याच्या तीव्र इच्छेने ते विद्यापीठात दाखल झाले. आर्थिक अडचणींमुळे वर्षभरातच त्यांना शिक्षण सोडावे लागले; त्याचबरोबर शिक्षणासाठी कर्ज घेतले असता ती कर्जफेड न झाल्याने त्यांना थोडे दिवस तुरुंगातही जावे लागले. नंतरच्या चार वर्षांत त्यांनी अनेक प्रकारची कामे केली; पण कशातही त्यांचे मन रमले नाही. १८०५ साली फ्रँकफुर्ट येथे वास्तुकलेचा अभ्यास करीत असताना फ्रबेल यांची योहान हाइन्‍रिक पेस्टालॉत्सी (Johann Heinrich Pestalozzi) या स्विस शिक्षणतज्ज्ञांच्या ग्रुनेर नावाच्या शिष्याशी ओळख झाली. ग्रुनेर यांच्या आग्रहाखातर त्यांच्याच शाळेत फ्रबेल शिक्षक म्हणून काम करू लागले. हा व्यवसाय त्यांच्या आवडीचा होता. १८०८ साली ते स्वित्झर्लंडमधील इव्हरडन येथे पेस्टालोत्सी यांच्या शाळेत दाखल झाले. तेथे दोन वर्षे राहून त्यांनी पेस्टालोत्सी यांच्या अध्यापनपद्धतीचा सूक्ष्म अभ्यास केला.

फ्रबेल यांनी स्वतंत्रपणे शिक्षकाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि गटिंगेन व नंतर १८११ साली बर्लिन विद्यापीठात अध्ययन केले. विद्यापीठात शिकत असतानाच १८१३ मध्ये ते सैन्यात दाखल झाले. सैन्यात त्यांची लँगेथल व मिडेनडॉर्फ या दोघांशी मैत्री झाली. हे दोघे त्यांचे अखेरपर्यंत सहकारी होते. सैनिकी दलातून परतल्यावर बर्लिन विद्यापीठात त्यांना नोकरी मिळाली. तेथेच त्यांनी भौतिकी, रसायनशास्‍त्र, भाषाशास्‍त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला.

फ्रबेल यांनी १८१६ साली ग्रीशायम (जर्मनी) येथे शाळा काढली व ती १८१७ साली कीलां (जर्मनी) येथे हलविली. ही शाळा पेस्टालोत्सी यांच्याच शैक्षणिक तत्त्वावर सुरू केली होती; परंतु पेस्टालोत्सी यांच्या पद्धतीतील काही उणिवा त्याना जाणवू लागल्या. त्यांचे शिक्षणविषयक विचार परिणत होत गेले. १८२६ साली द एज्युकेशन ऑफ मॅन (इं. भा. १८८५) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. फ्रबेल यांच्या एका मित्राने स्वित्झर्लंडमधील लूझर्न प्रांतातील आपला एक किल्ला (दुर्ग) फ्रबेल यांना शाळा काढण्यासाठी दिला. त्यामुळे १८३१ साली त्यांनी त्या दुर्गात शाळा काढली व लवकरच ती त्याच प्रांतातील व्हिलिझाऊया या गावी हलविली. दोन्ही ठिकाणी कॅथलिक धर्मगुरूंचा विरोध झाल्यामुळे शाळा यशस्वी झाली नाही; पण स्विस सरकारने त्यांना शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काम दिले. ते १८३७ पर्यंत स्वित्झर्लंडमध्ये राहिले. त्याच वर्षी त्यांनी ब्‍लांकेनबुर्ग येथे पहिली बालवाडी काढली. ही शाळा १८४४ साली आर्थिक अडचणींमुळे बंद करावी लागली; तथापि या वेळेपर्यंत त्यांच्या शाळेला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली होती आणि तिच्या धर्तीवर अनेक शाळा जर्मनीत निघाल्या होत्या. १८४४ ते १८४९ या काळात त्यांनी जर्मनीभर व्याख्यानांद्वारा आपल्या शिक्षणविषयक विचारांचा प्रसार केला. १८४९ साली मारिएंथल (थुरिंजिया) येथे त्यांनी प्रशिक्षण शाळा काढली. दुर्दैवाने १८४८ साली यूरोपात झालेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर त्यांची विचारसरणी स्फोटक समजली जाऊ लागली व १८५१ साली बालोद्यान पद्धतीवर प्रशियन सरकारने बंदी घातली.

फ्रबेल यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानावर त्यांच्या वैयक्तिक जीवनातील, विशेषतः त्यांच्या बालपणातील, प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम झालेला आहे. रोपट्याच्या संगोपन-संवर्धनासाठी माळी हा जसा प्रयत्‍न करतो, तसाच प्रयत्‍न आईवडिलांनी मुलांच्या विकासासाठी केला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाला नैतिक व सामाजिक अशा दोन बाजू आहेत. बालकांच्या निकोप व प्रबळ इच्छाशक्तीचा संपूर्ण विकास हे त्यांचे शिक्षणविषयक ध्येय होय. ऐच्छिक कृती व स्वयंप्रेरित कृती हा शिक्षणाचा पाया असल्याने कृतियुक्त शिक्षणपद्धती हीच शिक्षणाची खरी पद्धती होय, अशी त्यांची भूमिका होती. त्यांची शिक्षणपद्धती क्रीडन पद्धतीवर आधारलेली आहे. खेळ ही एक बालस्वभावविशिष्ट क्रिया असून तीमुळे बालकाच्या वृत्ती व जीवन यांचा विकास होतो. खेळांतून मुलांचा निसर्गाशी व जगाशी संबंध येतो. खेळाद्वारे विश्रांती, सहेतुकता, शिस्त आणि स्वातंत्र्य यांसारख्या गोष्टी साध्य करता येतात. नैसर्गि‌क खेळांमुळे मुलांना पूर्णत्व प्राप्त होते. म्हणूनच रूसोप्रमाणे फ्रबेल यांनी निसर्गशिक्षणाला चालना दिली. भिन्न कार्यांतून आणि व्यवसायांतून शिक्षण द्यावे, असाही विचार त्यांनी मांडला. फ्रबेल यांनी पुरस्कारलेली बालोद्यान पद्धती (Kindergarten) आधुनिक शिक्षणशास्‍त्रात महत्त्वाची समजली जाते. जगभर माँटेसरी शिक्षण पद्धती इतकीच ती प्रचलित आहेफ्रबेल यांचे ग्रंथ पुढील : दि एजियुकेशन ऑफ मॅन(१८२६), इन्वेटींग किंडरगार्टन (१८२७), मदर्स साँग्ज, गेम ॲण्ड स्टोरीज (१८४५), दि पेडॉगॉजिक्स ऑफ दि किंडरगार्टन (१८६१), दि साँग्स ॲण्ड म्युझिक ऑफ फ्रीड्रिख फ्रबेल्स मदर प्ले (१८९५), रिव्हायवल : ऑटोबायग्राफी ऑफ फ्रीड्रिख फ्रबेल (१९९५), इत्यादी.

फ्रबेल यांचे मारिएंथल येथे निधन झाले.

माय मराठी  विषय - मायबोली  माय बोली माझी भाषा अर्थ देते भावनांना, तिच्या रहावे ऋणात वाटते हो माझ्या मना. माझी बोली भाषा ओव्या,अभंगानी सजते, ...