डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
देशाला अनेक राष्ट्रपती लाभले जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अव्वल होते, त्यापैकी देशाला लाभलेले एक राष्ट्रपती म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. ज्यांचा जन्म दिवस अनेक शिक्षकांच्या कामगिरीची सराहना करण्यासाठी साजरा केला जातो, तो दिवस म्हणजे ५ सप्टेंबर शिक्षक दिन.
तर आजच्या लेखात आज आपण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी थोडीशी माहिती पाहूया, जी आपल्याला त्यांच्या विषयी असलेल्या काही गोष्टींचे ज्ञान देऊन जाईल. तर चला जाणून घेवूया, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये तामिळनाडू मध्ये तीरुत्तानी येथे एका गरीब ब्राम्हण परिवारात झाला होता, तीरुत्तानी हे त्याकाळी मद्रास संस्थानात होते. ब्राम्हण परिवारात जन्म झालेला असल्याने डॉ. राधाकृष्णन यांच्या वडिलांची एक इच्छा होती, कि राधाकृष्णन यांनी भविष्यात पांडित्य शास्त्राचा अभ्यास करून मोठे पंडित व्हावे,पण जेव्हा राधाकृष्णन यांना शाळेत टाकले तेव्हा ते अभ्यासात अतिशय हुशार निघाले, ते अभ्यासात एवढे हुशार होते कि त्यांनी बरेचश्या शिष्यवृत्या प्राप्त केल्या होत्या, याच शिष्यवृत्यांच्या भरवशावर त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला. पहिले वेल्लूर च्या वूर्ही कॉलेजला गेले त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेज मध्ये आपले शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
मद्रास ख्रिश्चन कॉलेज मध्ये त्यांनी फिलोसोफी हा विषय निवडला, फिलोसोफी हा विषय त्यांनी यासाठी निवडला होता कि त्यांच्या कडे बाकी विषयांचे पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते, फिलोसोफी या विषयाचे पुस्तके सुद्धा त्यांनी त्यांच्या एका नातेवाईका कडून घेतले होते ज्याने त्याच कॉलेजातून त्याचे फिलोसोफी चे शिक्षण पूर्ण केले होते,त्यानंतर त्यांनी कसून अभ्यास केला आणि फिलोसोफी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते पास झाले. सोबतच त्यांनी विसाव्या वर्षी स्वतः वेदांत तत्वज्ञानावरील प्रबंध या विषयाचे लिखाण केले. आणि ते लिखाण सर्वोत्तम म्हणून घोषित सुद्धा करण्यात आले होते, अश्या प्रकारे त्यांचे जीवन एक वेगळे वळण घेत होते, स्वतःच्या कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी खूप मोठी उपलब्धी मिळविली होती.समोरील शिक्षणासाठी त्यांनी नितीशास्त्र हा विषय निवडला, तेव्हा त्यांनी नितीशास्त्रातून स्वतःची एम.ए. ची पदवी मिळविली.१९०८ सालानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडन्सी या कॉलेजात फिलोसोफी हा विषय शिकवायला सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९१७ पर्यंत आपली सेवा दिली, त्यानंतर ते कलकत्ता युनिवर्सिटीत कार्यरत झाले, असे करता करता करता त्यांनी अनेक युनिवर्सिटीत कार्यभार सांभाळला.
१९३१ साली इंग्लंडने डॉ.राधाकृष्णन यांना सर या पदवी ने सन्मानित केले, १९४६-४९ या काळात त्यांची निवड राज्य घटनेच्या समितीचे सभापती म्हणून झाली होती,डॉ.राधाकृष्णन हे बनारस हिंदू युनिवर्सिटी आणि आंध्र युनिवर्सिटीचे सुद्धा कुलगुरू राहिले होते. यादरम्यान त्यांना आंध्र युनिवर्सिटीने १९३९ मध्ये डी.लिट. हि पदवी बहाल केली होती.डॉ. राधाकृष्णन यांचा विवाह लहानपणी म्हणजेच सोळाव्या वर्षी सिवकामू नावाच्या मुलीशी झाला होता, त्यांचे वैवाहिक जीवन बऱ्यापैकी होते, त्यांना एकूण सहा मुल, मुली होते त्यापैकी एक मुलगा होता त्याचे नाव त्यांनी सर्वपल्ली गोपाल असे ठेवले होते, त्यांचे पारिवारिक जीवन चांगले सुरु होते पण १९५६ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले, या गोष्टीचे त्यांना दुखः झाले पण ते त्यांचे कर्तव्य बजावत राहिले.
Comments
Post a Comment